राज्यात पावसात घट, ५ जूनपर्यंत कोरडे हवामान: कृषी विभागा कडून पेरणी न करण्याचं आवाहन

मुंबई / प्रतिनिधी: यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा 10 दिवस आधी, म्हणजेच 25 मे रोजी दक्षिण कोकणात दमदार हजेरी लावली. मात्र आता 27 मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती मंदावणार आहे, ज्यामुळे राज्यात काही दिवस पावसात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 जूनपर्यंत बहुतांश भागात कोरडे हवामान राहील आणि तापमानातही काहीसे वाढ होऊ शकते.
कोकण वगळता राज्यातील इतर भागांत पावसाचा काहीसा ब्रेक लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी, पेरणी किंवा लागवडीची घाई करू नये, असे कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केले आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे अनेकांना वाटले की मान्सून लवकरच सर्वत्र पोहोचेल. मात्र हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जर घाई केली, तर पेरणी वाया जाऊ शकते आणि नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य वेळेची वाट पाहत, खात्रीशीर पावसाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983