निष्पक्षपणे २४ तास समाजासाठी कार्य बजावणाऱ्या पत्रकारांचे समाजातील योगदान आदर्शवत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

सोलापूर : “निष्पक्षपणे २४ तास समाजासाठी कार्य करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे,”असे मत केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जीवन गौरव व पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. हा कार्यक्रम सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे संपन्न झाला.
प्रमुख उपस्थिती:
कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, तसेच पत्रकार संघाचे सल्लागार राकेश टोळ्ये, प्रदेशाध्यक्ष मनीष केत, डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री मोहोळ म्हणाले:
“स्वातंत्र्य लढ्यातून ते कोविडच्या काळात, पत्रकारांनी नेहमीच आपले कर्तव्य बजावले आहे. संकटाच्या काळातही त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे.”
त्यांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या समाजकार्यासही विशेष गौरवोद्गारांतून उल्लेख केला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे म्हणणे:
“चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रेरणा दिली जाते. योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाल्यास त्या पुरस्काराची उंची वाढते. पत्रकारांच्या गरजांसाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.”
कार्यक्रमाची सुरुवात:
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी आपल्या प्रस्ताविकेत पत्रकारांना मान्यता पत्रिका संख्येत वाढ करण्याची, तसेच सोलापूर विमानतळावरून हैदराबाद व तिरुपतीसाठी विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली.