चाणक्यनीती सांगते ‘या’ सवयीअंगीकारा मग काय यश, संपत्ती मानसिक शांती तुमच्या पायात..!

ऑनलाइन डेस्क : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथांमधून यश, जीवनशैली आणि उत्तम निर्णयक्षमतेसंदर्भात अनेक अमूल्य मार्गदर्शक तत्वं दिली आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनातही त्यांच्या विचारांची उपयुक्तता तसूभरही कमी झालेली नाही. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी घेतले जाणारे काही साधे पण प्रभावी निर्णय, आपल्या यशाचा पाया ठरू शकतात.
चाणक्यांच्या नीतीनुसार, झोपण्याआधी अंगीकारायच्या ‘या’ सवयी तुम्हाला फक्त यशस्वीच नाही तर समृद्ध आणि मानसिकदृष्ट्या शांत देखील बनवू शकतात.
दिवसभराचा हिशोब घ्या
झोपण्याआधी 5 मिनिटं शांत बसा आणि दिवसभर काय झालं याचा विचार करा. कोणत्या चुका केल्या, काय चांगलं केलं, काय सुधारता येईल – यावर विचार करा. ही सवय तुम्हाला आत्मपरीक्षणाची सवय लावेल आणि आत्मविश्वास वाढवेल.
ध्येयावर लक्ष केंद्रित करा
आपल्या ध्येयांचा पुन्हा विचार करणे म्हणजे मेंदूला यशासाठी “रीप्रोग्राम” करणं. चाणक्य सांगतात, ज्याचं ध्येय स्पष्ट असतं, त्याचं मन कधी भरकटत नाही. रात्री आपल्या ध्येयाचा विचार करा, आणि मनात सकारात्मक चित्र उभं करा – जसं की तुम्ही ते ध्येय गाठलंत.
कृतज्ञता व्यक्त करा
दिवसभरात तुम्हाला जे चांगलं मिळालं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ही सवय तुमचं मन अधिक सकारात्मक ठेवते आणि निराशा दूर करते. चाणक्यांचं मत होतं की संतुष्ट मनच पुढे जाण्याची खरी प्रेरणा देतं.
उद्याच्या दिवसाचं नियोजन करा
रात्रीच पुढच्या दिवसाचं थोडकं नियोजन करा. कोणते महत्त्वाचे काम आहे, काय टाळायचं आहे, कुठे लक्ष द्यायचं आहे – याचा आराखडा ठरवा. नियोजन नसलेलं आयुष्य दिशाहीन ठरतं, हे चाणक्य वारंवार सांगतात.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!