युद्धाच्या उंबरठ्यावर भारत-पाकिस्तान! पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे;

विशेष/प्रतिनिधी: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्करामध्ये धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत – अधिकारी आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत.
गेल्या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याचा दुवा पाकिस्तानशी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने आपल्या तीनही सैन्यदलांना अलर्ट मोडवर ठेवले. त्याचवेळी पाकिस्ताननेही सीमारेषेवर सैन्य हालचाली सुरू केल्या, परिणामी युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्करात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे. सध्या 250 अधिकारी आणि 1200 सैनिकांनी राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या 11व्या कोअरचे प्रमुख यांनी लष्करप्रमुख यांना पाठवलेल्या गोपनीय पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बोकारी यांच्या पत्रानुसार, क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प्स मांगला रिजन आणि नॉर्दर्न कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी वैयक्तिक कारणे, कामाचा तणाव आणि भारताशी निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत सरकारकडून ठोस धोरण न मिळाल्याचा दाखला देत राजीनामे सादर केले आहेत. विशेषतः मांगला रिजनमध्ये 50 अधिकारी आणि 500 सैनिकांनी लष्करी सेवेतून निवृत्तीची मागणी केली आहे.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी जनसंपर्क विभागाने तातडीने हस्तक्षेप करून युद्धाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सैनिकाने अथवा अधिकाऱ्याने राजीनामा देऊ नये, अशी तंबी दिली आहे. यामुळे सध्या राजीनाम्यांची लाट काहीशी आटोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.
इतकेच नाही तर, परिस्थिती अधिक बिघडण्याच्या भीतीने पाकिस्तानी बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांची कुटुंबे देश सोडून परदेशात स्थलांतर करत असल्याची माहितीही पुढे आली आहे. अलीकडेच लष्करप्रमुख आणि नेते यांच्या कुटुंबांनी पाकिस्तान सोडल्याचे वृत्त आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी 1948, 1965, 1971 आणि 1999 मध्ये युद्धे झाली असून, प्रत्येक युद्धात भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता या परिस्थितीत पाकिस्तान सरकार कोणती पावले उचलते आणि युद्धाचा धोका कसा टाळला जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.