‘जगण्याचा कंटाळा आला’; कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीने केली आत्महत्या

सोलापूर/प्रतिनिधी : दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या एका या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘मला जगण्याचा कंटाळा आला आहे’ अशी चिठ्ठी घटनास्थळी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
निकालानंतर काही तासांतच घेतला टोकाचा निर्णय
ही विद्यार्थिनी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. निकालात ६२ टक्के गुण मिळाल्याची माहिती तिने आपल्या वडिलांना फोनवर माहिती दिली होती. आणि तिने काही वेळेनंतर हॉस्टेलमध्ये खोली रिकामी असताना, ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
हिच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक, मानसिक दबाव आणि हॉस्टेल व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. टोकाचा निर्णय का घेतला, तिला मदतीची गरज होती का, याचे उत्तर शोधणे समाजाच्या जबाबदारीचे आहे. ही केवळ आत्महत्या नसून, मुलींच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, व्यवस्थेचा ताण, आणि संवादाचा अभाव यांचे तीव्र उदाहरण आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेला विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा व विश्वासार्ह संवाद यंत्रणा उभारणे आता काळाची गरज आहे.