महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस एक मे रोजी महाराष्ट्राला देणार हे मोठे समृद्ध गिफ्ट!


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू

मुंबई / प्रतिनिधी: महाराष्ट्रातील दळणवळणाच्या इतिहासात क्रांती करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आता अखेर पूर्ण क्षमतेने जनतेसाठी खुला होणार आहे. येत्या 1 मे 2025 रोजी, महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

मुंबई ते नागपूर आता फक्त 8 तासांत!
या ऐतिहासिक टप्प्यामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास अवघ्या 8 तासांत शक्य होणार असून, मुंबई ते नाशिक अंतर केवळ 3 तासांत पार करता येणार आहे.
इगतपुरी ते आमण (76 किमी) हा अखेरचा टप्पा पूर्ण झाल्याने संपूर्ण 701 किमी लांबीचा महामार्ग आता प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

समृद्धी महामार्ग – एक आर्थिक महासत्ता
सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्हे थेट आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी जोडले गेले आहेत.
या महामार्गाने फक्त प्रवासाचा वेळ कमी केला नसून, औद्योगिक विकासाचे दालनही उघडले आहे.
• महामार्गावर 24 इंटरचेंज,
• दर 30-40 किमीवर 18 नियोजित टाऊनशिप,
• शिक्षण, आरोग्य, मनोरंजन अशा सुविधा,
• तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क —
यामुळे हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी एक ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.

विकासाच्या दिशेने ‘समृद्ध’ पाऊल
या महामार्गाचे उद्घाटन याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टप्प्याटप्प्याने झाले होते. मात्र अखेरचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे आता तो संपूर्ण राज्यासाठी खुला होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा या महामार्गाचा उल्लेख “माझं स्वप्न” असा केला आहे. आता हे स्वप्न 1 मे रोजी सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होणार आहे.
” समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे! “


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button