वाहतूक नियम कडक! नियम तोडल्यास होणार इतका दंड
मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास ₹५००० दंड

मुंबई/सहदेव खांडेकर : मुंबई वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) वाहतूक सुरक्षितता आणि नियमांचे पालन अधिक काटेकोर करण्यासाठी दंडात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आता हेल्मेट न घातल्यास ₹1,000, तिहेरी प्रवास केल्यास ₹1,000, आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यास ₹10,000 एवढा दंड आकारला जाणार आहे.
नव्या नियमांनुसार, मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास ₹5,000 दंड, तर वेगमर्यादा ओलांडल्यास हलक्या वाहनांसाठी ₹1,000 आणि जड वाहनांसाठी ₹2,000 एवढा दंड ठोठावला जाणार आहे.
Big Breaking : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगोलमध्ये कोसळला एलियन? नागरिक म्हणाले…
वाहतूक पोलिसांनी सांगितले की, या कठोर उपाययोजनांचा मुख्य उद्देश रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी लोकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यास प्रवृत्त करणे आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
तुमच्यावर दंड लागू होऊ नये यासाठी कोणते नियम पाळावे?
नेहमी हेल्मेट घाला.
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा.
दोनपेक्षा जास्त स्वार दुचाकीवर बसवू नका.
परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. वाहतूक सिग्नलचे पालन करा आणि अयोग्य पार्किंग टाळा.