बेशिस्त वागल्यास सोडणार नाही : पो.नि. विनोद घुगे

नाझरे / प्रतिनिधी: गावात वाद विवाद न करता एकोप्याने राहून सुसंवाद वाढवा, गावात शिस्त ठेवा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका व प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल तयार करा व जर अडचण आल्यास आपण सर्व प्रश्नांची सोडवणूक करू परंतु शिस्तीचे पालन करा व गावातील भांडणे गावातच मिटवा.
यासाठी पक्ष पार्टी न पाहता प्रत्येकाने समंजसपणे वागा व मोबाईलचा वापर कमी करा, व बेशिस्त वागल्यास सोडणार नाही. असा इशारा सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नाझरे आउट पोस्ट भेट प्रसंगी नागरिकांशी बैठकीत बोलताना दिला.
आयुष्यामध्ये आपण काम करीत असताना मानव हाच एकमेव केंद्रबिंदू म्हणून काम करीत आलो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना जात पात पाहिली नाही व त्यांच्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते.
यासाठी जातीपातीचे राजकारण करू नका, तसेच नाझरे हे गाव संतांची भूमी आहे. त्यामुळे संतांच्या विचारावर वाटचाल करून गावाचा विकास करा तसेच प्रत्येक मुला- मुलींनी आई-वडिलांना संभाळा. सांगोला तालुका मोठा आहे.
पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांचे ही सर्वांनी स्वागत केले. तसेच यावेळी बहुजन भारत संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे, पत्रकार रविराज शेटे, भाजपा अध्यक्ष नंदकुमार रायचुरे, युवा नेते दादासो हरिहर यांनीही मत व्यक्त केले.
यावेळी सरपंच विजय सरगर, उपसरपंच सुमित्रा लोहार, वजरे सरपंच मल्लेश चव्हाण व पोलीस पाटील संघटनेतर्फे साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, सामाजिक कार्यकर्त अप्पू राज आदाटे, शशिकांत पाटील, सुभाष कोकरे, आनंदा कोकरे, शरद गुरव, महेश वाघमारे, सोमनाथ पेशवे, रफिक काझी, अलीम काझी, अरुण सरगर,
सर्व पोलीस पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर, पोलीस हवालदार अनिल बनसोडे, संजय भानवसे, पोलीस नाईक एस आर जाधव, नाझरे व परिसरातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.