पुण्यात जलसंपदा विभागाची बैठक; आ. बाबासाहेब देशमुख आक्रमक
संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी

पुणे/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज पुण्यात पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत पाणीप्रश्नांवर आक्रमक भूमिका
या बैठकीत सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील पाणीप्रश्नांवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आक्रमक झाले. त्यांनी एन.आर.बी.सी कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बैठक आयोजित करण्याची मागणी केली.
त्याचबरोबर, सांगोला व पंढरपूर तालुक्याला हक्काचे पाणी वेळेत मिळाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
राज्याच्या दोन्हीं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आरोपीवर कठोर करवाई करणार, पाहा काय म्हणाले…
महत्त्वाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
- एन.आर.बी.सी कॅनॉलचे अस्तरीकरण लवकर सुरू करावे. यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.
- सांगोला व पंढरपूर तालुक्याला हक्काचे पाणी वेळेत मिळावे.
- चालू उन्हाळी आवर्तन २ मार्चपासून सुरू करावे.
- पाणी वापर संस्थांना अनुदान परतावा त्वरीत द्यावा.
- पाणीपट्टीची वाढीव रक्कम शेतकऱ्यांसाठी परवडणारी नाही, त्यामुळे ती कमी करावी.
- मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
- बैठकीत उपस्थित मंत्री व अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मकता दर्शवली आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
- शेतकऱ्यांच्या मागण्या आणि जलव्यवस्थापन यासंदर्भातील पुढील निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती
सध्या उन्हाळ्याचा काळ सुरू असल्याने पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. त्यामुळे २ मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू करण्याची मागणी करण्यात आली.