वैष्णवी आत्महत्याप्रकरण; पोलिसांचा हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करू: गिरीश महाजन यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी: मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असताना, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेबाबत गंभीर दखल घेतली आहे. “मलाही दोन मुली आहेत. वैष्णवीचे फोटो पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
महाजन म्हणाले, “ही घटना अतिशय वेदनादायक आहे. वैष्णवीवर करण्यात आलेला मानसिक छळ आणि पैशांसाठी दिलेली धमकी पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हगवणेना फाशीची शिक्षा व्हावी, अशी जनतेची भावना आहे.”
या प्रकरणात सासरे व दीराला अटक झाली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. याबाबत बोलताना महाजन म्हणाले, “पोलिसांकडून कुठलीही हलगर्जीपणा झाल्यास ती सहन केली जाणार नाही. चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
वैष्णवीच्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधत त्यांनी त्यांना धीर दिला असून, विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचेही महाजन यांनी सांगितले.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983