नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू, १० गंभीर जखमी : हिमांशू उपाध्याय
प्लॅटफॉर्मवरील गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याची मागणी होत आहे

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर २ गाड्या, २ प्लॅटफॉर्म आणि चेंगराचेंगरीमुळे मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी या घटनेच्या प्राथमिक कारणांची माहिती दिली आहे.
कशामुळे घडली दुर्घटना?
प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर पटना दिशेने जाणारी मगध एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर जम्मूकडे जाणारीउत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेस उभी होती.
#WATCH | Stampede at New Delhi railway station | A porter (coolie) at the railway station says "I have been working as a coolie since 1981, but I never saw a crowd like this before. Prayagraj Special was supposed to leave from platform number 12, but it was shifted to platform… pic.twitter.com/cn2S7RjsdO
— ANI (@ANI) February 16, 2025
प्रवासी भरभरून ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावत होते.
१४ आणि १५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्ममधील पायऱ्यांवर एक प्रवासी घसरला, त्यामुळे मागे उभे असलेले अनेकजण पडले आणि चेंगराचेंगरी झाली.
कुलीने दिली धक्कादायक माहिती :
रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या एका कुलीने सांगितले की, “मी १९८१ पासून कुलीचे काम करत आहे, पण अशी गर्दीमी कधीच पाहिली नव्हती.”
प्रयागराज स्पेशल गाडी प्लॅटफॉर्म १२ वरून सुटणार होती, पण अचानक ती प्लॅटफॉर्म १६ वर हलवण्यात आली.
१२ नंबर प्लॅटफॉर्मवर असलेली गर्दी आणि बाहेर थांबलेले प्रवासी १६ नंबर प्लॅटफॉर्मकडे धावले.
सीढ्यांवर आणि एस्केलेटरवर चेंगराचेंगरी झाली आणि लोक पडू लागले.
India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी रणनीती
रेल्वे प्रशासनाची चौकशी सुरू
या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याची मागणी होत आहे.