महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरूच; राज्यात नद्याना तुडुंब, सहा जिल्ह्यांना अलर्ट

विशेष प्रतिनिधी: राज्यात मान्सूनने आगमनाची जोरदार नोंद केली असून, महाराष्ट्रात पावसाचे संकट अजूनही कायम आहे. हवामान विभागाने सोमवारी राज्यातील सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोकणात मान्सून सक्रिय
केरळमध्ये मान्सून दाखल होताच अवघ्या २४ तासांत तो कोकणात पोहोचला आहे. यंदा मान्सून तब्बल बारा दिवस आधीच राज्यात दाखल झाला. कोकणात प्रचंड पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरीतील सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत.
भीमा नदीचा धोका वाढला
सोलापूर जिल्ह्यात आणि भीमा-नीरा खोऱ्यात दमदार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नीरा नदीतून ३०,००० क्युसेक पाणी भीमा नदी पात्रात सोडले जात आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर येथील ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे, तर पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरेही पाण्याने वेढली आहेत.
मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस
मुंबईत रविवारी रात्रीपासून सतत पाऊस सुरू असून, जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचले आहे. हवामान विभागाने पुढील दोन तास मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, शासकीय रुग्णालयातही पाणी साचले आहे.
विदर्भात नुकसान, मराठवाड्यात शेतीवर परिणाम
विदर्भात पावसाचा जोर मागील पंधरा दिवसांपासून सुरू असून, यामुळे उन्हाळी मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातही पावसाचा शेतीवर वाईट परिणाम झाला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात पावसाने ब्रेक घेतला असून, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत विश्रांती आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983