पन्हाळा किल्ल्यावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे १९ फेब्रुवारी रोजी आयोजन : जिल्हाधिकारी अमोल येडगे
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

कोल्हापूर /राजू मुजावर : केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेचा मुख्य कार्यक्रम पुण्यातील शनिवार वाड्यावर होणार आहे.
पदयात्रेचा प्रारंभ आणि मार्ग :
• पदयात्रेचे उद्घाटन सकाळी ७:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी भाषणाने होईल.
• सकाळी ८ वाजता पदयात्रेला प्रारंभ होईल आणि १० वाजता समारोप होईल.
• ६ ते ८ किमी अंतर पार करत पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणी जाणार आहे.
पदयात्रेच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त आयोजित पदयात्रेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये विविध प्रशासनिक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
बैठकीस उपस्थित अधिकारी:
• निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली
• महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी
• उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे
• पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की
• जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ
• तसेच विविध शैक्षणिक संस्था, पर्यटन समिती व युवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग
• पन्हाळगडावरील शिवाजी महाराज मंदिर, बाजीप्रभू पुतळा, तीन दरवाजा, अंबरखाना, अंबाबाई मंदिर मार्गांवर पदयात्रा होणार आहे.
• तळसंगी कॉलेज, वारणा, संजीवनी स्कूल, पन्हाळा पब्लिक स्कूल आणि इतर शाळांचे विद्यार्थी सहभागी होतील.
• छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव परिधान केलेले विद्यार्थी, ग्रामस्थ आणि खेळाडू मिळून ३,००० हून अधिक लोक पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
• राज्यातील ३९५ गावांतील शाळांमध्ये प्रत्येकी १ किमी अंतराची पदयात्रा निघणार आहे.
स्वच्छता आणि समाजप्रबोधन उपक्रम :
• १९ फेब्रुवारीच्या आधी सर्व गडकोटांवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
• १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी शालेय स्तरावर योगा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पदयात्रेचे उद्दिष्ट
• छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणे
• देशभक्ती आणि नेतृत्वाचा प्रचार
• सुशासनाविषयी जागरूकता वाढवणे
• युवकांचा सहभाग आणि समाजातील एकात्मता वाढवणे
पश्चिम महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबांच्या खेट्यास उद्यापासून सुरुवात,पुजारी आनंदा लादे म्हणाले…
ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर करण्यासोबतच युवकांमध्ये स्वावलंबन आणि स्वदेशी भावनेचा प्रचार करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.