जवळा गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या भानुदास साळुंखे यांच्या अर्जाला जिल्हा सत्र न्यायालयाकडून केराची टोपली ; सरपंच सज्जन मागाडे

सांगोला / प्रतिनिधी : संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जवळा हे गाव विकासाचे रोल मॉडेल मानले जाते. परंतु, गावातीलच राजकीय द्वेषातून काही वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांना गावाचा हा विकास बघवत नाही. अशाच लोकांनी गावातील एका मंदिराच्या कामाविरोधात पंढरपूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
परंतु, पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने जवळा गावाच्या विकासाच्या आड येणाऱ्या भानुदास साळुंखे यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली असल्याची माहिती जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी दिली. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वैफल्यग्रस्त भावनेतून विकासाच्या मार्गात अडफाटा घालण्याचा प्रयत्न केला तरी गावाचा सर्वांगीण विकास ते थांबवू शकणार नाहीत असेही यावेळी सरपंच मागाडे यांनी सांगितले.
जवळा ता सांगोला गावातील अनेक विकासकामे सध्या प्रगतीपथावर आहेत.गावातील सर्व कामे शासकीय नियमांचे पालन करून नियमाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करून आणि टेंडर प्रक्रिया राबवूनच होत आहेत. परंतु ज्यांना आजवर स्थानिक राजकारणाच्या लढाईत कधीच गुलाल लागला नाही. असे जळक्या प्रवृत्तीचे पिसाळलेले विघ्नसंतोषी लोक गावच्या विकासाला अडफाटा घालण्याचे पाप करत आहेत.
गावातील ताईबाईच्या मंदिराला सभामंडप करण्याची मागणी अनेक वर्षांपासून गाव परिसरातील महिलांकडून होत होती. म्हणूनच या मंदिराच्या सभा मंडळासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हे काम होऊ नये म्हणून काही मंडळी कुणाच्या तरी सांगण्यावरून न्यायालयात गेली आणि हे काम होऊ नये यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
जिल्हा सत्र न्यायालयात ग्रामपंचायतीची बाजू न्यायाची आणि विकासाची असल्याने न्यायालयाने अर्जदार भानुदास साळुंखे यांनी केलेला अर्ज नामंजूर करून अक्षरशः त्यांच्या अर्जाला जणू केराची टोपली दाखवली.
जवळा गावचा सध्या चौफेर विकास सुरू आहे. विकासाच्या बाबतीत हे गाव अगदी राज्याच्या नकाशावरही ओळखले जाते. स्थानिक पातळीवर विकासाची ॲलर्जी आणि राजकारणाची कावीळ झालेल्या मंडळींना नेमका जवळा गावचा विकासच नको असल्याने कुठे काहीच हाताला लागत नाही.
म्हणून सध्या उठसुठ प्रत्येक कामाविरोधात न्यायालयात तक्रार करण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला आहे मात्र या प्रकरणात त्यांना न्यायालयाने विकासाच्या आड येणाऱ्या मंडळींना सणसणीत चपराक दिली असल्याचेही यावेळी जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी स्पष्ट केले.
जवळ्याच्या विकासाची बुलेट ट्रेन थांबणार नाही,
गावातील काही जळक्या प्रवृत्तीचे आणि असंतुष्ट आत्मा असलेले लोक विकासाच्या कामात नेहमीच आडकाठी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य आणि केंद्रपातळीवरील अनेक योजना गावात राबवून सध्या ग्रामपंचायत गावात विकासाचा डोंगर उभा करत आहे.
मात्र काही जळक्या प्रवृत्तीचे लोक गावात कितीही आदळआपट केली तरी आपला निभाव लागत नाही हे लक्षात आल्याने न्यायालयात अर्ज करून विरोध करत आहेत. मात्र कुणी कितीही आदळआपट केली तरी, जवळा गावच्या विकासाची बुलेट ट्रेन काही केल्या थांबणार नाही.
मा. बाबासाहेब इमडे, मा उपसरपंच, जवळा.