‘या’ बोर्डर सध्या बंद राहणार!
पोलीस आणि सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न थांबवला

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : हरियाना आणि पंजाबमधील सीमा आणि पंजाबचे इतर महामार्गउघडण्याची मागणीकरणाऱ्या याचिकेवर सुनावणीकरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टात याचिका, न्यायाधीशांनी सुनावणीस नकार दिला.
शंभू बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटना आंदोलन करत असून पंजाबचे इतर महामार्गही बंद केले असून. शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरवरून दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीस काय म्हणाले :
शंभू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणावर दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार दिला आहे. न्यायमूर्तीसुर्यकांत यांच्या अधेक्शेखालील खंडपीठाने याप्रकरणीएक याचिकाआधीच प्रलंबित असून नव्यायाचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी होणार नाही असे सांगण्यात आले.
राष्ट्रीय हायवे बंद करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी
या जनहित याचिकेमध्ये शंभू बॉर्डरसह महामार्ग उघडण्यासाठी केंद्र, पंजाब आणि हरियाणा सरकारला निर्देश देण्याची मागणी केली आहे. याचिकेमध्ये नमूद आहे की, महामार्ग अडवणे हे लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. तसेच, हे राष्ट्रीय महामार्ग कायदा आणि BNS कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे महामार्ग जाम करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी.
केंद्र, हरियाणा आणि पंजाब सरकारला निर्देश देण्याची मागणी
याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र, पंजाब आणि हरियाणा सरकारला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना महामार्गांवरून हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. याचप्रमाणे, शेतकऱ्यांच्या विरोध प्रदर्शनामुळे लोकांच्या सार्वजनिक प्रवासात अडथळे येऊ नयेत, हे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा
कोर्टात दाखल याचिकेमध्ये म्हटले आहे की, सार्वजनिक प्रवास सुरळीत राहण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गांवर आंदोलन करू नये. या अडथळ्यांमुळे लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो.
फेब्रुवारीपासून शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणा दरम्यान शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहेत. रविवारी पुन्हा एकदा पोलीस आणि सुरक्षा दलांनी दिल्लीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न थांबवला.