देश- विदेश

Pahalgam Terror Attack : भारत करणार सर्जिकल स्ट्राईक; भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही!


विशेष प्रतिनिधी : जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभर खळबळ उडवली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील दौरा तात्काळ रद्द करून थेट भारतातप्रत आले. मोदींनी भारतात येताच पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील परतल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची उच्चस्तरीय बैठक होणार असून, दहशतवादाविरोधातील पुढील पावले याच बैठकीत ठरवली जाणार आहेत.

कोणालाही सोडणार नाही, आणि भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही  : गृहमंत्री अमित शहा

गृहमंत्री अमित शहा यांनीही खोऱ्यात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी एलजी मनोज सिन्हा आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहा म्हणाले, कोणालाही सोडणार नाही, आणि भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही.

तीनही लष्करप्रमुखांशी अतितत्काळ बैठक : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही लष्करप्रमुखांशी अतितत्काळ बैठक घेतली आहे. लष्कर सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वेळेस पाकिस्तानवर हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करून ५०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, हे लक्षात घेता पुन्हा अशी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button