देश- विदेशमहाराष्ट्र

परभणीत समृध्दी महामार्ग रस्त्यात गेलेल्या पाईपलाईन विहीर-फळबागांची केलीच नाही नोंद?

उपोषणं संघर्ष करुन शेतकरी व्यंकटराव देसाई यांना मरायची आली वेळ!


परभणी/आनंद ढोणे पाटील : चुडावा येथील प्रगतशील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी त्यांच्या शेतातून गेलेल्या समृध्दी महामार्ग रस्त्यात  गोदावरी नदीवरुन तिन किमी अंतरावरून केलेली ६ ईंची पाईपलाईन बुडाली आहे,तसेच फळबाग,विहिरी गेल्यात त्याची नोंद न घेतल्यामुळे त्यांनी गोदावरी नदीपात्र काठावरील श्रिक्षेत्र गंगाजीबापू देवस्थानावर ६ जून रोजी पासून बेमुदत अमरण उपोषण चालू केले आहे.

या आधी त्यांनी मे महिन्यात स्वतः च्या शेतात अमरण उपोषण केले होते.त्यावेळी, पाणीपुरवठा योजनेचे अभियंता, महसूल तहसीलदार यांनी आश्वासन दिले होते की, पाइपलाइन, विहीर, फळबागांची नोंद घेवू.परंतू अद्याप ती घेतलीच नाही.शेतकरी व्यंकटराव देसाई यांच्या पिंपळगाव लिखा शिवारातील गट क्रमांक १५८ मधून साडेतीन एकरात समृध्दी महामार्ग रस्ता गेला आहे.या भागात त्यांची मोठ्या क्षेत्रावर बागायती जमीन आहे. ती सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांनी गोदावरी नदीवरुन पाईप लाईन केली आहे.विहीर फळबागा आहेत.तरीही नोंदणी केली नाही.

उपोषणं व संघर्ष करुन व्यंकटराव देसाई यांची मरायची वेळ आली तरी अद्याप कोणताही अधिकार कर्मचारी उपोषणस्थळी फिरकला नाही.आता ते वैतागून जात जवळील गोदावरी नदीपात्रात उडीमारुन जलसमाधी घेण्याच्या तयारीला लागलेत.उपस्थित त्यांना समजावत आहेत.

जालना ते नांदेड समृध्दी महामार्ग द्रुतगती रस्त्यात

पिंपळगाव बाळापूर,माटेगाव,पूर्णा, पिंपळगाव लिखा,चांगेफळ आणि पुढे नांदेड कडील शिवारातून जालना ते नांदेड समृध्दी द्रुतगती महामार्ग रस्ता गेला आहे.हा अधिक रुंदीकरण जमीन क्षेत्र व्यापणारा रस्ता असल्यामुळे यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात.

परिणामी,यात शेतीकरुन जगणा-या शेतकऱ्यांची जन्माची भाकर हिरावून घेतल्या गेली.समृध्दी महामार्ग रस्ताग्रस्त सबंधीत शेतकरी हैराण आणि बेचैन झाल्याचे पहावयास मिळत आहे.वावरातून हा मोठा रस्ता गेल्यामुळे त्यात ब-याच शेतकऱ्यांची जमीन कायमची गेली.रस्त्यासाठी जमीन भुसंपादीत होवून रोडच्या दोन्ही बाजूने उर्वरित जमीनीचे छोटछोटे तुकडे पडले.ती कमी क्षेत्राची जमीन वाहून पीक घेणं मुश्किल झालं.

सदर रस्त्यात भुसंपादन झालेल्या जमीनीपोटी मावेजा देखील अत्यंत कमी मुल्यांकनाने दिला जात आहे. जमीनीत असलेली फळबाग,विहिरी,पाईपलाईन, फार्महाऊस शेतीघरे ही मालमत्ता रोडमध्य क्षतीग्रस्त होवूनही अशा काही ठिकाणच्या बाबींची जिवन प्राधीकरण ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद परभणी,महसूल विभागातील जबाबदार अधिकारी कर्मचारी नियमात असूनही जाणिवपूर्वक नोंद घेत नाहीत.हे सबंधीत खात्याचे अधिकारी हे की जसे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अधिकारी महसूल गंगाखेड, तहसीलदार, नायब तहसीलदार पूर्णा, जिवन प्राधीकरण ग्रामीण पाणीपुरवठा जि.प.चे कार्यकारी अभियंता, स्थानिक विभाग अभियंता हे समृध्दी महामार्ग रस्त्यात गेलेल्या पाईपलाईन,विहीर, फळबाग यांची स्थळपाहणी तपासणी करुन आढळून येवूनही‌ त्याची रितसर नोंदणी न करता उलट समृध्दी महामार्ग द्रुतगती रस्ता बांधणी करणा-या कंत्राटदाराची पाठराखण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सदर रस्त्याकरीता जमीन भुसंपादन झाली त्या जमीनीतून गेलेली तसेच दुरवरुन गोदावरी,पूर्णा नदी वरुन बागायती पीक सिंचनासाठी  जमीनेचे मॉडगेज गहानखत बँकेला करुन देत लाखो रुपये कर्ज काढून आणली केली अशा ६,४,३ ईंची पाईपलाईन, विहीर,फळबागांची नोंद अर्ज विनंती, उपोषणे संघर्ष करुन देखील का केली जात नाही?हे मोठे न उलगडणारे कोडे संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी करुन ठेवले आहे.त्यामुळे सदर बाबींची नोंद करण्यासाठी संबंधीत शेतकरी रात्रंदिवस झोप न घेता अमरण वारंवार उपोषणं संघर्ष करुन मरणयातना भोगत आहे. तरी देखील अधिकारी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समस्यांचे काहीच गांभीर्य दिसून येत नाही.उलट हे अधिकारी ज्या काहींच्या शेतात पाईपलाईन, विहीर, फळबाग, बागायती शेती नाही,अशांच्या मात्र नोंद घेण्यात आल्यात.

यात उपविभागीय अधिकारी, तलाठी यांनी सबंधीताकडून लाखो रुपयांच्या लालसेने अधिक मावेजा प्राप्त करुन दिल्याचे प्रकार घडले असल्याचे शेतकरी सांगतात.तर मग ज्या शेतकऱ्यांच्या शेतात खरच पाईलाईन, विहीर, फळबाग आहेत अशांच्या नोंदी का घेतल्या नाहीत.त्या घेण्यासाठी सबंधीत शेतकऱ्यांना उपोषणे संघर्ष आणि प्रयत्नांची अथक पराकाष्ठा करावी लागत आहे.तरी शुध्दा त्यांची तशूभरही दख्खल घेतली जात नाही.हा कोणता शासनाचा उफराटा जिवगेणा न्याय आहे?असा सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.

सदर प्रश्नाविषयी आता या पुढे पूर्णा तालूक्यातील वंचित शेतकरी मोठा आंदोलनाचा लढा उभारण्याच्या तयारीला लागलेत.याची गांभीर्याने प्रशासनाने नोंद घेणं आवश्यक आहे अन्यथा शेतकरी आत्मदहना सारखे टोकाचे पाऊल उचलतील तेंव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button