महाराष्ट्रकृषी

राज्यात 24 तासात मुसळधार पाऊस ! हवामान विभागाने दिला हाय अलर्ट

हवामान खात्याचा अंदाज ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहू शकते वारे


भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, ज्याचा मोठा परिणाम अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे.

विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये हवामानाचा तडाखा, IMD दिला इशारा

यलो अलर्ट: अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी जारी.
ऑरेंज अलर्ट: यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी लागू.

विदर्भातील अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळत असून, नागपूरसह आसपासच्या भागात लवकरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button