कृषीदेश- विदेशमहाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; काही भागांत गारपीट, अकोल्यात सर्वाधिक तापमान ४२.४ अंशांवर


मुंबई : हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाचा तसेच गारपीटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात कमाल तापमानात घट दिसून येत असली, विदर्भात उष्णतेची लाट अजूनही कायम असल्याचे निरीक्षण केले गेले आहे.

तापमानात बदल:

अकोल्यात रविवारी ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून, येथे तापमानात जळजळ जाणवली. विदर्भ भागात तापमानाच्या उच्चतेमुळे ऊष्णतेची लाट दिसून येत असून, इतर काही भागांत तापमानात घट अनुभवायला मिळत आहे.

या भगात गारपीटी व अवकाळी पाऊस:

रविवारी (दि.१३) जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला आहे.

हवामान बदलाचे कारण:

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पश्चिम भागापासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण पोषक बनले आहे. तसेच, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरीही, हवामान अस्थिर राहण्याची शक्यता पुढील दोन दिवसांमध्ये वर्तविली जाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button