Operation Sindoor Updates :“इन पब्लिक न्यूज”ची १२ तास आधीच ‘ऑपरेशन शिंदूर’ची मोठी अपडेट;‘कुछ तो बडा होगा’! दिला इशारा

दिल्ली/विशेष प्रतिनिधी : पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर “इन पब्लिक न्यूज”ने तब्बल १२ तास आधी मोठी माहिती उजेडात आणत ‘कुछ तो बडा होगा’ असा इशारा दिला होता.

“इन पब्लिक न्यूज”च्या दिल्लीमधील सूत्रांनी काल 6 मे रोजी दुपारी १.३५ ला राजधानी दिल्लीमधील हालचालींचा आणि भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे अशी गोपनीय माहिती आपल्या वाचकांसमोर आणली होती. ही माहिती सत्य ठरली, जेव्हा रात्री १.२८ वाजता भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला.

Operation Sindoor भारतीय लष्करानं (Indian Army) पाकिस्तानातील (Pakistan) तब्बल 9 दहशतवादी तळांवर (Terrorist Base) हल्ला केला. पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिल आहे. पण त्यासोबतच पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांनाही भारताने न्याय दिला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतरही (India Air Strike 9 Terror Bases In Pakistan) पाकिस्तानने कुरापती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भारतीय लष्कर सोडणार नाही. भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत माघारी धाडलंय.
जम्मू पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने “ऑपरेशन सिंदूर” राबवले. आज (बुधवारी) मध्यरात्री १.२८ च्या सुमारास भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आली.
“इन पब्लिक न्यूज”ने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध करत, अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली.