हवाई हल्ल्याचा इशारा! सायरन वाजल्यावर वाचण्यासाठी असतो केवळ ६० सेकंदांचा वेळ

विशेष प्रतिनिधी : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात नुकताच मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट सराव करण्यात आला. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवण्यात आला आणि नागरिकांना अशा स्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
कधी वाजतो सायरन?
हवाई हल्ल्याचा धोका निर्माण होताच ‘एअर रेड सायरन’ वाजवण्यात येतो. हा सायरन सुमारे ६० सेकंद वाजतो आणि नागरिकांना त्वरीत सुरक्षित स्थळी जाऊन आश्रय घेण्यास सूचित करतो. सायरनचा आवाजही विशिष्ट आणि तीव्र असतो, जेणेकरून तो दूरवर ऐकू जावा.
कसं ओळखायचं धोका?
हवाई दलाचे रडार शत्रूच्या क्षेपणास्त्र, रॉकेट्स किंवा लढाऊ विमानांची माहिती पकडतात. त्यांची दिशा आणि गती लक्षात घेऊन संभाव्य हल्ल्याच्या भागात रेड अलर्ट जाहीर केला जातो. तेथेच सायरन वाजवून नागरिकांना इशारा दिला जातो.
फक्त एक मिनिट..
सायरन वाजल्यानंतर नागरिकांकडे सुरक्षित स्थळी जाण्यासाठी अवघा एक मिनिटाचा वेळ असतो. त्यामुळे संकटाच्या वेळी काळजी घेण्याऐवजी आधीच सज्जता महत्त्वाची मानली जाते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सज्ज
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर देशात अशा प्रकारच्या मॉक ड्रिल्सना गती देण्यात आली आहे.