देश- विदेशराजकीय

पाकिस्तानचा खोटा प्रपोगंडा उघडा! राजनाथ सिंह यांच्या नावाने फिरणारं पत्र फेक


नवी दिल्ली / प्रतिनिधी: “ऑपरेशन सिंदूर”च्या यशानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात अपप्रचार सुरु आहे. त्यातच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाने एक खोटं पत्र सोशल मीडियावर फिरवण्यात येत आहे. मात्र PIB (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) ने या पत्राचा फॅक्ट चेक करत त्यात केलेले दावे फेटाळून लावले आहेत.

या खोट्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदमपूर एअरबेसला भेट दिल्याचा आणि 112 भारतीय सैनिक शहीद झाल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. पण PIB च्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराकडून अशा प्रकारचं कोणतंही पत्र जारी करण्यात आलेलं नाही.

PIB ने स्पष्टपणे म्हटलं आहे की,

“हे पत्र बनावट असून पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सद्वारे भारताविरोधात खोटा प्रचार केला जात आहे. नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावं आणि फक्त अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा.”

यापूर्वीही पाकिस्तानने भारताच्या लष्करावर किंवा सरकारवर खोटे आरोप करणारे इन्फोग्राफिक्स, मेसेजेस आणि व्हिडिओज व्हायरल केले होते, जे PIB ने वेळोवेळी खोटे ठरवले आहेत.

PIB चं आवाहन:

“फेक न्यूज आणि बनावट माहिती पसरवणाऱ्या पोस्ट्सना फॉरवर्ड करू नका. सरकारी माहितीचे अधिकृत स्रोत तपासा!”


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button