गुंठेवारीचा तिढा सुटला! १-२ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री आता शक्य?
पाहा निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे!

मुंबई/सहदेव खांडेकर : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने गुंठेवारी जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे 1-2 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करणे शक्य होणार आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा :
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले जमिनीचे व्यवहार मार्गी लागणार आहेत.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार लहान भूखंड खरेदी करणे शक्य होईल.
प्रशासकीय प्रक्रिया सुलभ :
गुंठेवारी जमिनीच्या नियमनामुळे प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होईल.
जमिनीच्या नोंदी अद्ययावत होण्यास मदत होईल.
सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!
शहरी आणि ग्रामीण विकासाला चालना:
लहान भूखंडांची खरेदी-विक्री वाढल्याने शहरी आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल.
गृहनिर्माण क्षेत्रालाही फायदा होईल.
निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:
1947 च्या तुकडेबंदी कायद्यातील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.
2017 च्या सुधारणेतील 25% शुल्क कमी करून 5% शुल्क आकारण्यात येणार आहे.
विहीर, घर बांधकाम आणि रस्त्यांसाठी गुंठेवारी जमीन खरेदी-विक्रीला परवानगी मिळेल.