देश- विदेशमहाराष्ट्र

सोलापुरात नव्या पाईपलाईनचा फटका: लाखो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान


सोलापूर/सागर धर्मे : लांबोटीजवळ नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये मोठा फटका बसला आहे. या पाईपलाईनला अचानक गळती लागल्याने लाखो लिटर पाणी फवाऱ्यासारखं उडून वाया गेलं. आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या सोलापूर शहरासाठी ही घटना अतिशय धक्कादायक ठरत आहे.

या गळतीमुळे केवळ पाणीच वाया गेले नाही, तर आसपासच्या प्रचंड मातीचा देखील ढिग वाहून गेला आहे. परिणामी, अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा पाईपलाईनच्या कामांमध्ये नेमकी चूक कुठे होते, याचा तात्काळ शोध घेणं गरजेचं आहे. नियोजनातल्या त्रुटीमुळे आमच्यावर संकट कोसळलं आहे.

सोलापूर शहरात दर पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अशा वेळी लाखो लिटर पाणी वाया जाणं ही गंभीर बाब आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामात हलगर्जीपणा झाला का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button