Operation Sindoor : भारताने दिले पाकिस्तानला धडकी भरवणारे प्रतिउत्तर ; ९ दशतवादी स्थळ उद्धवस्त

दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन प्रमुख ‘हॉप कमांडर्स’चा खात्मा केला. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध होत असतानाच, भारत सरकारने ठोस कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
6 मे रोजी मध्यरात्री १.२८ च्या सुमारास राबवलेल्या या गुप्त आणि अचूक कारवाईत, पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या प्रमुख दहशतवादी संघटनांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या तळांवर सुमारे ९०० दहशतवादी उपस्थित असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
ही कारवाई अत्यंत गोपनीयतेत आणि अचूक नियोजनात पार पडली. पाकिस्तानच्या आतल्या भागात घडवलेली ही मोहीम म्हणजे भारताची सर्जिकल स्ट्राइक नंतरची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे.
6 मे रोजी मध्यरात्री १.२८ वा एनएसए अजित डोवाल यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला, भारतीय विमानांनी ऑपरेशन सिंदूर करण्यासाठी आकाशात झेप घेत उड्डाण केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.