आरोग्यदेश- विदेश

मनाची शुद्धता!


विशेष वृत्त : आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. कोणी सहकाऱ्याच्या रूपात असतात तर कोणी मार्गदर्शक. कोणी मदत करते तर कोणी मदत घेतात. बरेच लोक थोड्या काळासाठीच सानिध्यात असतात तर काही कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात असतात.

जे आपल्यापासून दूर जातात ते नेहमी आपल्या संपर्कात असतात. मात्र काही जण गायबच होतात. पुन्हा मागे वळून पाहणे नाही अशी त्यांची अवस्था असते. आपल्याला मात्र त्यांची आठवण येत असते.
आपण त्यांच्या संपर्कात नसलो तरी ते स्मरणात असतात.

ज्यांनी आपल्याला मनस्ताप दिलेला असतो अशा माणसांची नावे व आठवणी डिलीट केलेल्या बऱ्या. कारण सतत ते आठवण्याने आपली मनःस्थिती बिघडते, पर्यायाने आपल्या आरोग्यावर व कौटुंबिक वातावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो.

संकल्प

मनात चांगल्या आठवणी जपता आल्या तर जपू पण वाईट आठवणींचा कचऱ्याचे मात्र लगेच निर्मूलन करू व आपले मानसिक आरोग्य जपू.

– सौ. स्नेहलता स. जगताप.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button