मनाची शुद्धता!

विशेष वृत्त : आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. कोणी सहकाऱ्याच्या रूपात असतात तर कोणी मार्गदर्शक. कोणी मदत करते तर कोणी मदत घेतात. बरेच लोक थोड्या काळासाठीच सानिध्यात असतात तर काही कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात असतात.
जे आपल्यापासून दूर जातात ते नेहमी आपल्या संपर्कात असतात. मात्र काही जण गायबच होतात. पुन्हा मागे वळून पाहणे नाही अशी त्यांची अवस्था असते. आपल्याला मात्र त्यांची आठवण येत असते.
आपण त्यांच्या संपर्कात नसलो तरी ते स्मरणात असतात.
ज्यांनी आपल्याला मनस्ताप दिलेला असतो अशा माणसांची नावे व आठवणी डिलीट केलेल्या बऱ्या. कारण सतत ते आठवण्याने आपली मनःस्थिती बिघडते, पर्यायाने आपल्या आरोग्यावर व कौटुंबिक वातावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो.
संकल्प
मनात चांगल्या आठवणी जपता आल्या तर जपू पण वाईट आठवणींचा कचऱ्याचे मात्र लगेच निर्मूलन करू व आपले मानसिक आरोग्य जपू.
– सौ. स्नेहलता स. जगताप.