रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारची कटिबद्धता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

विशेष /प्रतिनिधी: देशातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सतत वाढत राहाव्यात यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ५१,००० हून अधिक नियुक्ती पत्रे वाटप केल्यानंतर आयोजित १५व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी, “तरुणांसाठी आजचा काळ हा अभूतपूर्व संधींचा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताला सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. परिणामी, प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत आहेत.”
उद्योग क्षेत्रात विक्रमी प्रगती
ऑटोमोबाईल आणि पादत्राणे उद्योगांमध्ये उत्पादन व निर्यातीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे, ज्यामुळे लाखोंना रोजगार मिळाला आहे.
वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी
“२०१४ पूर्वी अंतर्देशीय जलवाहतुकीद्वारे केवळ १८ दशलक्ष टन मालवाहतूक होत होती, ती आता १४५ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. राष्ट्रीय जलमार्गांची संख्या ५ वरून ११० वर गेली असून, त्यांची एकूण लांबी २,७०० किमीवरून ५,००० किमी पेक्षा जास्त झाली आहे,”
महिला शक्तीचा उत्कर्ष
देशात महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रांत वाढत आहे, “यावर्षी UPSC परीक्षेत पहिल्या पाच टॉपर्सपैकी तीन महिला आहेत. तसेच ९० लाखांहून अधिक बचत गटांमध्ये १० कोटींहून अधिक महिला कार्यरत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
“महिला शक्ती आज नोकरशाहीपासून अवकाश आणि विज्ञानाच्या क्षेत्रातही नवीन शिखरे गाठत आहे. ग्रामीण भागात महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे,”
तरुणांची भूमिका आणि भारताचा डिजिटल जलवा
“या दशकात तंत्रज्ञान, डेटा आणि नवोन्मेष यामध्ये भारताची झपाट्याने प्रगती झाली आहे. रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. जेव्हा देशाचे तरुण राष्ट्रनिर्मितीत सक्रियपणे सहभागी होतात, तेव्हा विकासाला वेग येतो आणि भारताला जागतिक स्तरावर मान्यता मिळते.”
“आपल्या सरकारची कटिबद्धता आहे की देशातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सातत्याने वाढत राहाव्यात. त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.