भीमा-नीरा नद्यांचे रौद्ररूप! विष्णूपद मंदिर पाण्याखाली, अनेक पवित्र स्थळे जलमय

पंढरपूर / प्रतिनिधी: मुसळधार पावसामुळे भीमा आणि नीरा नद्यांनी धोकादायक पातळी गाठली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळांना पाण्याचा वेढा बसला असून, गोपाळपूरजवळील वारकरी संप्रदायासाठी पवित्र असलेले ‘विष्णूपद मंदिर’ पूर्णपणे जलमय झाले आहे. या मंदिराजवळील हनुमान व नारद मंदिरासह इतरही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
गेल्या दोन दिवसांच्या तुफान पावसामुळे नीरा नदीच्या पुरामुळे चंद्रभागेची पातळी दोन मीटरने वाढली आहे. पंढरपूर येथील विठुरायाचे विश्रांती स्थान देखील पाण्याखाली गेले आहे.
नीरा नदीकाठचा अकलूज शहर आणि अकलाई मंदिर परिसरही जलमय झाला असून, अमावस्येनिमित्त दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी नदीचे हे रौद्र रूप पाहत गर्दी केली.
गुरसाळे येथे भीमा नदी पात्रातील महादेव मंदिरात अडकलेले तीन महाराज आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. दहिगावसह परिसरातील ओढे आणि नाले भरून वाहू लागले असून, स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983