
सांगोला/विशेष प्रतिनिधी : शिक्षकांच्या पगारातून कट केला जाण्याचा प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अनेक संस्थाचालकांनी डिडक्शनच्या नावाखाली दरमहा 20% रक्कम कापण्याचे प्रकार सर्रास सुरू केले आहेत. हा प्रकार शिक्षणक्षेत्रासाठी अत्यंत लाजिरवाणा असून, यावर लवकरच कठोर पावले उचलली जाणार आहेत, असे अजित पवार एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
दोषींवर कडक कारवाई करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. “शिक्षकांच्या पगारातून कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर कापणी होणे सहन केले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ईडी चौकशीची मागणी
शिक्षक संघटनांनी संस्थाचालकांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यासाठी ईडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. “ज्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, ती नेमकी कशी आली याचा शोध घेण्याची गरज आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार थांबतील आणि पारदर्शकता निर्माण होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 पैकी 80 संस्थाचालक वेतनातून वसुली करत आहेत, तर 95% संस्थाचालकांकडे उत्पन्नाच्या स्रोताशिवाय कोट्यवधींची संपत्ती आहे, अशी माहिती देण्यात आली.
संस्थाचालकांच्या संपत्तीचा स्रोत संशयास्पद
शिक्षक संघटनांनी म्हटले आहे की, अनेक संस्थाचालकांकडे त्यांच्या उत्पन्नाशी विसंगत असलेली कोट्यवधींची संपत्ती दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था पवित्र कार्य करत असूनही काही लोभी संस्थाचालकांच्या गैरकृत्यांमुळे शिक्षणक्षेत्राचे नाव खराब होत आहे.
डिडक्शनच्या नावाखाली पगारातून वसुली
शिक्षकांकडून वेतनात काप केलेल्या रकमेचा हिशोब दिला जात नाही. विविध कार्यक्रमांचे आयोजन, डिडक्शनची पद्धत आणि इतर कारणांच्या माध्यमातून शिक्षकांना आर्थिकदृष्ट्या त्रास दिला जात आहे. शिक्षक संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषी संस्थाचालकांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
प्रायव्हेट कॉलेजमध्ये अगदी म्हटलं तर 99% कॉलेजमध्ये पगार घ्या आणि द्या . ही पॉलिसी तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग, फार्मसी ,आयटीआय या सर्व कॉलेजमध्ये चालू आहे कोणी कंप्लेंट केली तर त्याच्या नोकरीवर गदा येते त्याला टार्गेट केली जाते अजून त्याची मानसिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या पिळवणूक केली जाते त्यामुळे लोक या मार्गात पडत नाहीत यावर TAP.NAP सारखी संघटना खूप आवाज उठवते परंतु सरकार त्याला जास्ती सपोर्ट करत नाही. कारण सरकार मध्ये बसलेले सर्व भ्रष्टाचारी संस्थाचालक आहेत.
अजित दादा बोलले हे किती सत्य होईल याची पण मोठी शंकाच आहे.
धन्यवाद.