शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : राज्यभरात ३ ते ८ जून दरम्यान जनावरांचे बाजार बंद!

ऑनलाईन डेस्क : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, गोवंश हत्या टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) सभापतीवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. बकरी ईद दरम्यान गैरकायद्याने गोवंशाची कत्तल होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगली असून, बाजार समितीमार्फत निरीक्षण आणि नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या निर्देशानुसार, बाजार समितीच्या सभापतीकडे मांस बाजारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असेल, तसेच कोणतीही बेकायदेशीर हालचाल आढळल्यास तातडीने पोलीस व संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, पशुसंवर्धन विभाग, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासह संयुक्त गस्त व तपासण्या करण्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाची ही तयारी आहे.
नागरिकांना शांतता व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले असून प्रतिबंध घालण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!