देश- विदेश
भारत-चीन सीमा वाद सोडवण्यासाठी सहमती; पाहा हे सहा मुद्दे
बीजिंगमध्ये भारताचे आणि चीनचे विशेष प्रतिनिधी यांच्यात 23 वी बैठक

इन पब्लिक न्यूज /अविनाश बनसोडे : भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमधील सीमा वाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. बीजिंगमध्ये भारताचे आणि चीनचे विशेष प्रतिनिधी (एसआरएस) यांच्यात 23 वी बैठक झाली. या बैठकीत सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली असून दोन्ही देशांच्या संबंधांना नवी दिशा मिळाल्याचे दिसून येत आहे.
- किलाश मानसरोवर यात्रा सुरू होण्याची शक्यता :
2020 पासून थांबवण्यात आलेली किलाश मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होऊ शकते. दोन्ही देशांनी सीमा पार आदान-प्रदान आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. - सीमांवर शांतता आणि स्थिरता:
सीमा क्षेत्रात शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांनी ठोस उपाययोजनांवर चर्चा केली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. - व्यापार व सहकार्य वाढवणे:
सीमा पार व्यापार आणि आदान-प्रदान वाढवण्यासाठी सहमती झाली आहे. भारतीय तीर्थयात्रेची तिबेटमध्ये सुरूवात आणि नाथूला मार्गे व्यापार वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. - पाच वर्षांनंतर झालेली बैठक:
2019 मध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर तब्बल पाच वर्षांनी ही बैठक झाली. गलवान घाटीतील संघर्षानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. - सहकार्याची पुनर्निर्मिती:
दोन्ही देशांनी सीमा वाद सोडवण्यासोबतच व्यापार आणि धार्मिक सहकार्य वाढवण्याचा निर्धार केला आहे. - संबंध सुधारण्याची दिशा:
भारत-चीन संबंध सुधारण्याची दिशा स्पष्ट झाली असून आगामी काळात द्विपक्षीय सहकार्याला बळकटी मिळणार आहे.
सीमा वादासारख्या संवेदनशील मुद्द्यावर झालेली ही सहमती भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरू शकते. ही बैठक भविष्याच्या शांततामय सहजीवनाचा पाया रचेल.